
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : शासन निर्णयानुसार दिव्यांग योजनांची ग्रामपंचायत स्तरावर गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या मागणीचे प्रहार दिव्यांग संस्थेच्या वतीने सोमवारी( दि १८) रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी व गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले .

निवेदनाचा आशय असा की , दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांगाच्या सर्व तक्रारींचे निवारण करण्याचे अधिकार गटविकास अधिकारी यांना दिलेले आहेत . असे असतानाही बहुसंख्य ग्रामपंचायतीन मध्ये शासन निर्णयानुसार अंमलबजावणी होताना दिसत नाही , यात प्रामुख्याने सार्वजनिक शासकीय इमारतीत दिव्यांगांना विना अडथळा वावर व्हावा यासाठी रॅम्प व रेलिंग पाईपची सोय असायलाच पाहिजे , प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग कक्ष व मार्गदर्शक असावा , दिव्यांगांना स्वयंम रोजगारासाठी जागा किंवा ग्रामपंचायतने बांधलेल्या माळ्यांत 5 % आरक्षण द्यावे, ग्रामपंचायत उत्पन्नातून 5 % राखीव निधी खर्चाबाबत अनियमितता व पारदर्शीपणा नाही अशा अनेक शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच दिव्यांग संजय गांधी पेन्शन योजनेचे मानधन मिळावे आदी मागण्याचे निवेदन गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले .
याची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेवटी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे . निवेदनावर तालुका अध्यक्ष बाळू बैरागी,उपाध्यक्ष अर्जुन देवरे संघटक माधव शिरसाठ ,प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव ,बापू वानखेडे,किरण सोनवणे, ज्ञानेश्वर चव्हाण,हरिसिंग ठोकेदशरथ पूरकर , शिवाजी बर्वे , पोपट मोरे, भगवान वाघ , भगवान वाघ , शशिकांत पवार , बापू देवरे आदींच्या सह्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम