
देवळा : देशात पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात होणार असल्याने हा दिव्यांग बांधवांकरिता ऐतिहासिक क्षण असल्याने याचे देवळा तालुकयातील प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत पेठे वाटून स्वागत करण्यात आले .

प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री व आमदार बच्चू कडू यांच्या विशेष प्रयत्नातून देशात पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात होणार असल्याची घोषणा शिंदे फडवणीस सरकारने नुकतीच केली आहे .महाराष्ट्रात स्थापन होणाऱ्या दिव्यांग मंत्रालयामुळे दिव्यांग बांधवांच्या समस्या तात्काळ मार्गी लागणार असून , त्यांना शासनाच्या विविध योजनांचा यामुळे लाभ घेता येणार आहे .
सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्र भारतातील दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून , देवळा तालुक्यातील दिव्यांग बांधवानी या निर्णयाचे देवळा पाच कंदीलवर फटाक्यांची आतषबाजी करत व पेठे वाटून आनंदोत्सव साजरा केला .
यावेळी उप नगराध्यक्ष जितेंद्र आहेर , माजी उप नगराध्यक्ष अतुल पवार ,भाजपा नेते भाऊसाहेब पगार , नगरसेवक कैलास पवार , माजी नगरसेवक दिलीप आहेर , हर्षद भामरे ,अनिल आहेर आदींसह प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, दिव्यांग संघनेचे तालुका अध्यक्ष अर्जुन देवरे , ग्रामपंचायत सदस्य सुनील पगार , भाउसाहेब मोरे , बापू देवरे , दशरथ पुरकर , शशिकांत पवार आदींसह माधव शिरसाठ ,शिवाजी शिरसाठ ,सुपडू चव्हाण ,अर्जुन शेवाळे ,सुभाष जाधव , शिवाजी भदाणे ,हरीसिंग ठोके , विलास देशमुख ,संजय मेणे , शशिकांत कोतकर आदी अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम