द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; गणेश उत्सव संपला आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती नवरात्रीची. राज्यभरात मुंबई वगळता सर्व ठिकाणी गरबा खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केल्याचं सांगण्यात येत आहे.
मागील दीड वर्षाहून अधिक काळापासून कोरोनाने सर्वच प्रकारच्या सनांवर विर्जन घातलं आहे. ज्यामुळे कोणीही कोणताही सण मनासारखा साजरा करू शकत नव्हता. मात्र येऊ घातलेल्या नवरात्री मध्ये गरबा खेळण्यासाठी महाराष्ट्रभर परवानगी देण्यात आली आहे. मात्र यात मुंबई वगळली जाणार आहे.
या नवीन घोषणेमुळे गरबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आली आहे. मात्र यादरम्यान देखील सर्वांनी नियम पाळावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यामुळे आता नवरात्री मध्ये कशा प्रकारचे वातावरण असेल? आणि या केलेल्या घोषणेमुळे विपरीत परिणाम होऊन रुग्ण संख्या वाढणार तर नाही ना? अशी भीती देखिल व्यक्त केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम