‘वंदे भारत एक्स्प्रेस’ने मोडला बुलेट ट्रेनचा विक्रम; अवघ्या ५ तासात मुंबई गाठली

0
34

दिल्ली – देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसने एक नवा विक्रम बनवला आहे. या रेल्वेने अवघ्या ५२ सेकंदांत ताशी १०० किमीच्या वेगाने जात बुलेट ट्रेनला मागे टाकले. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.

अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावणाऱ्या वंदे भारतमधील नव्या ट्रेनची तिसरी चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. त्यावेळी अहमदाबादहून सकाळी ७ वाजता निघालेली ही ट्रेन दुपारी १२ वाजता मुंबईत पोहोचली. याचा अर्थ असा, ट्रेनने अवघ्या ५२ सेकंदांत ताशी १०० किमीपर्यंतचा वेग पकडला आणि फक्त ५ तासात मुंबईत पोहोचली. हाच वेग पकडण्यासाठी बुलेट ट्रेन ५४.६ सेकंदांचा अवधी घेते. तसेच, नव्या रेल्वेचा कमाल ताशी वेग १८० किमी असून जुन्या वंदे भारत रेल्वेचा कमाल वेग ताशी १६० किमी आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये :

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फोटोकॅटलिटिक एअर प्युरिफायर सिस्टम असून, ते ९९ टक्के किटाणू मारू शकते. यासह एसी, टीव्ही, स्वयंचलित दरवाजे, हायक्लास पँट्री व वॉशरूम, इत्यादी विमानातील अनेक सुविधा या रेल्वेमध्ये आहेत. ही रेल्वे पूर्णत: स्वदेशी बनावटीची आहे. तसेच रेल्वेत सेल्फ प्रोपेल्ड इंजिन, म्हणजे वेगळे इंजिन लावण्याची गरज ह्यात नसणार आहे.

या रेल्वेचा गुणवत्तेचा दर्जा ३.२ इतका असून जागतिक पातळीवर हा दर्जा २.९ इतका चांगला मानण्यात येतो. येत्या ऑक्टोबरपासून वंदे भारत एक्स्प्रेस रुळावर धावण्याची शक्यता आहे.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here