टाटा सन्स एअर इंडियाच्या नवसंजीवनीसाठी चार अब्ज डॉलरची गुंतवणूक उभारणार

0
33

मुंबई – एकेकाळी केंद्र सरकारची विमानसेवा कंपनी आता टाटाकडे असलेल्या एअर इंडियाच्या कर्ज परतफेडीसाठी आणि कंपनीच्या नवसंजीवनीसाठी समूह चार अब्ज डॉलरची गुंतवणूक उभारणारण्याची योजना आखत आहे.

टाटा सन्स इक्विटी आणि हायब्रीड डेटच्या माध्यमातून एअर इंडियासाठी निधी उभारणार आहे. एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी कंपनीने मोठे आणि अधिक व्याजदराचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड टाटाला करायची आहे आणि त्याचवेळी एअर इंडियाला मजबूत करण्यासाठी नवीन भांडवल देखील उभारायचे आहे.

एका वृत्तानुसार, लाइव्ह मिंटने या प्रकरणाशी संबंधित २ लोकांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. टाटा सन्सने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एअर इंडियाचे केंद्र सरकारकडून अधिग्रहित केले होते. टाटा सन्सने २.३ अब्ज डॉलर्सच्या एंटरप्राइझ मूल्याच्या करारावर स्वाक्षरी केली. या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे, की कंपनीला कर्जातून भांडवल उभारणे सोपे जाईल. परंतु इक्विटी मधून भांडवल निर्माण करण्यासाठी वेळ लागू शकतो, कारण एअरलाइन व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्या इक्विटी फंडांची संख्या कमी आहे.

एअर इंडियाच्या गुंतवणुकीसाठी विशेष सल्लागारांची नियुक्ती

टाटा सन्स लवकरच एअर इंडियाच्या गुंतवणूकीसाठी विशेष सल्लागारांची नियुक्ती करणार आहे. पण सध्या कंपनीने काही परदेशी कर्जदार आणि खाजगी इक्विटी फंडांशी अनौपचारिक बोलणी सुरू केली आहेत. जगभरातील एअरलाइन व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्या खासगी इक्विटी फंडांची संख्या तुलनेने कमी असल्याने या व्यवहाराला थोडा वेळ लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here