काय सांगता ! चक्क ट्रॅक्टरने ऑफिसला जातायेत आयटी व्यावसायिक

0
28

बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसानंतर पाणी साचल्याने भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील अनेक आयटी व्यावसायिकांना त्यांच्या कार्यालयात जावे लागते. त्यासाठी त्यांना ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागतेय. होय, कामगार ट्रॅक्टरने कार्यालयात जात आहेत.
एचएएल विमानतळाजवळील यमलुर पाण्याखाली गेले आणि त्यामुळे जवळपासच्या आयटी कंपन्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टरने त्यांच्या कार्यालयात जावे लागले.
बेंगळुरू येथील आयटी फर्मच्या एका महिला कर्मचाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, “आम्ही आमच्या कार्यालयातून इतक्या सुट्ट्या घेऊ शकत नाही, आमच्या कामावर परिणाम होत आहे.50 रुपये भाड्याने ट्रॅक्टर मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत.”
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आयटी कंपन्यांशी बंगळुरूमध्ये पाऊस आणि पाणी साचल्यामुळे झालेल्या 225 कोटी रुपयांच्या नुकसानीबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
बोम्मई यांनी सांगितले की, “आम्ही आयटी कंपन्यांना कॉल करू आणि त्यांच्याशी पाणी साचल्यामुळे झालेल्या समस्यांबद्दल बोलू. पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाई आणि इतर नुकसानांबाबतही चर्चा करू.”
आयटी कंपन्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आऊटर रिंगरोडचा प्रश्न सोडविण्यास सांगितल्यानंतर त्यांचे हे वक्तव्य आले आहे.
काल बंगळुरूच्या अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आणि रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले. शहरात अनेक ठिकाणी दुकाने आणि अपार्टमेंटच्या तळघरांमध्ये पाणी साचले होते.
एका स्थानिकाने सांगितले, “मुसळधार पाऊस पडला. सकाळी उठल्यावर पाणी साचू लागल्याचे आमच्या लक्षात आले. रस्त्यावरील डिव्हायडर पाणी साचल्यामुळे जवळपास पाण्याखाली गेले होते. माझे तळघर तुडुंब भरले होते आणि मला त्यातून पाणी उपसावे लागले.”

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here