भूषण चोभे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन निमित्त शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओझर (मिग) येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डी.एन.काळे साहेब, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था नाशिक व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मविप्र सेवक संचालक नानासाहेब दाते उपस्थित होते. तसेच स्वागत अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. एस.एस. काळे उपस्थित होते तसेच उपप्राचार्य व विज्ञान शाखा प्रमुख प्रा. एस. एल. वाघ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीपूजनाने करण्यात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानेश्वर बोराडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डी.एन.काळे साहेब ( विशेष लेखापरीक्षक) यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व पटवून दिले. जीवन कसे जगावे ? हे महत्वाचे असून माणूस कितीही मोठा झाला,कितीही पैसे कमविले तरी इतरांशी कसे वागावे ? शेजाऱ्यांशी कसे वागावे ? हे कळत नाही. भारताने जगाला संस्कृतीची देणगी दिली.
भारतीय संस्कृतीला पाच हजार वर्षाची परंपरा लाभलेली आहे. आज जगातील माणसे भारतीय संस्कृतीचा अभ्यास करीत आहे. गीता ही माणसाला जीवन कसे जगावे ? हे शिकविते तर भागवत हा ग्रंथ माणसाने कसे मरावे ? हे शिकविते. जगात दोन शक्ती तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यात आई–वडील व दुसरे शिक्षक हे तुमच्यावर रागावतील, चिडतील ते तुमच्या फायद्यासाठीच. त्यामुळे आई वडील, शिक्षक व जेष्टाचे आदर नेहमी बाळगा.
मान दिला तरच मान मिळतो. त्यामुळे राष्ट्राच्या उभारणीमध्ये तरूणांचा सक्रिय सहभाग अतिशय महत्वाचा आहे. मुलींना शिक्षण व संस्कार देणे व त्यातून आदर्श संस्कृती निर्माण होत असते. ज्या देशाची संस्कृती आदर्श असते तो देश जगामध्ये आदर्श देश असतो. आपल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटवून दिलेच मात्र वर्तमानात माजी संरक्षणमंत्री शरद पवार साहेबांनी एकच कन्या अपत्य जन्माला घालून ऑपरेशन केले. सर्वांसमोर एक आदर्श ठेवला.
तसेच त्यांनी महिलांना अनेक क्षेत्रात पन्नास टक्के आरक्षण देवून अनेक महिला अधिकारी घडविण्याचे काम केले. आपण पण सर्व जणांनी तरूणांपुढे काय आदर्श निर्माण करायचे ? काय आदर्श त्यांच्या समोर ठेवायचे ? याचे चितंन केले पाहिजे ? विद्यार्थ्याची विचार करण्याची शक्ती वाढली पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नानासाहेब दाते यांनी आपल्या मनोगतात जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू या मधील अंतर म्हणजे जीवन होय. जीवनात येवून स्वंयशीस्त बाळगून माणसाला जीवन यशस्वी करता येते. त्यासाठी आपल्यामध्ये संस्कार मूल्यांची जपवणूक व ठेवण हे राष्ट्रीय सेवा योजना देत असते. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामधून देशाचे नेतृत्व करणारी चळवळ उभी राहते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेची शिदोरी आयुष्यभर माणसाला पुरते.
मा. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी स्वागत अध्यक्ष या नात्याने सर्व मान्यवरांचे सर्वप्रथम स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या. या राष्ट्रीय सेवा योजनेमधून विद्यार्थ्यांना स्वत:सोबत जगत असतांना समाजाचे आपण देणे लागतो. समाजामध्ये मित्र, सवगंडी, समाज, गाव, तालुका आणि जिल्हास्तरा पर्यंत आपली नाव लौकिकात भर पडत असते. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जिल्हास्तरावर , विदयापीठस्तरावर, राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या प्रजासस्ताक संचलनामध्ये सहभाग नोंदविला आहे. तुम्हालाही तशी संधी मिळेल अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सोपान देशमुख यांनी केले तर आभाराचे कामकाज प्रा. शिवाजीराव कदम यांनी पाहिले. या कार्यक्रमासाठी 190 विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Very good news
Thanks for publishing on
Line news 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹