मुजोर ‘गोटु’ला आशीर्वाद ‘कुणाचा’ ? ; जमीन बळकवण्याचे तक्रारदाराचे आरोप ?

0
47

– अंकुश सोनवणे
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राज्यभर गाजलेला देवळा तालुक्यातील बनावट मुद्रांक घोटाळ्यातील आरोपी गोटु वाघ हा जामिनावर बाहेर आहे . एका शेतकऱ्यांला जमीन परस्पर विकण्याची जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप तक्रारीत आहे. पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळल्या असत्या तर आज त्याची हिम्मत इतकी वाढली नसती. खरच ह्या आरोपात तथ्य असेल तर गोटु वाघ ला राजकीय वरदहस्त कुणाचा हे शोधन महत्त्वाचे आहे.

जामिनावर बाहेर असलेला चंद्रकांत उर्फ गोटु वाघ हा धमक्या दमदाटी करत व्याजा स्वरुपी दिलेल्या पैशांची मागणी करतोय असे आरोप करत त्याच्यावर कारवाईबाबत सुनिल शेवाळे यांनी निवासी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यामुळे काही दिवस गायब असलेला तर जेलची हवा खाऊन देखील न सुधारलेला मुजोर गोटु वाघ हा अजून किती क्रूर कृत्य करणार हे येणारा काळच सांगेल.

गोटु वाघ यांच्याबद्दल दिलेली तक्रार

सुनील शेवाळे निवेदनात म्हणतात , गोटु वाघ हा मला धमकावत आहे , उध्वस्त करेल रस्त्यावर आणेल जीवे मारण्याची धमकी देत आहे. माझ्या कुटुंबाचा छेळ करत आहे. फोनवर धमकावत आहे बायको मुलांना त्रास देत आहे. अश्लील शिव्या देतोय. या गोटु वाघ वरती कारवाई करावी अशी मागणी शेवाळे यांनी केली,

अडचणीच्या काळात गोटु वाघ याकडून 2 लाख व्याजाने घेतले होते, मात्र सुनील यांनी 3 लाख 72 हजार परत देखील केले आहेत. मात्र या गिधाडाचे पोट काही भरले नाही, याने अजून 14 लाखांची मागणी केली आहे. पैसे दिले नाही तर जमीन विकून पैसे वसूल करू अशी धमकी मुद्रांक घोटाळ्यातील आरोपी चंद्रकांत उर्फ गोटु हा सर्वसामान्य शेवाळे कुटुंबियांना देतोय. याची मुजोरी इतकी वाढली की हा लोकांच्या जमिनी त्यांच्या सही विना विकण्याच्या धमक्या देऊ लागलाय.

सुनील यांच्या आईच्या नावाने असलेली 0.40 आर ही जमिनी गोटु वाघ ने हिरामण नामदेव ठाकरे यांच्या नावावर करण्यास भाग पाडले, हे ठाकरे देखील गोटु वाघ यांना मिळलेत असा आरोप सुनील यांनी केला आहे. आईच्या नावावरील जमीन गोटु वाघ ने अज्ञानाचा फायदा घेऊन बळकावली आहे. ठाकरे यांनी ही जमीन पुढे जाऊन गोटु वाघ च्या नावाने करून दिली आहे.

काय आहेत आरोप गोटु वाघ यांच्यावर 

● दोन लाखाच्या बदल्यात 3 लाख 72 हजार रुपये गोटु वाघ ने घेतले.

● 0.40 आर जमीन बळकावली

● 14 लाख रुपयांची मागणी करतोय

● संसार उध्वस्त करण्याची तसेच रस्त्यावर आणण्याची भाषा करतोय.

● जीवे मारण्याची धमकी देतोय

राजकीय वरदहस्त कुणाचा ?

तेलगी नंतर सर्वाधिक गाजलेले प्रकरण म्हणजे देवळा येथील बनावट मुद्रांक घोटाळा, बनावट मुद्रांक तयार करून गोटु वाघ याने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला शेकडो लोकांच्या जमिनी बळकावल्या, अनेकांना बेघर करून त्यांना उघड्यावर आणले , इतकं सारे क्रूर कृत्य एकटा गोटु वाघ साधा स्टॅम्प वेल्डर कदापि करणार नाही. यामागे राजकिय शक्ती असल्याशिवाय इतकी मुजोरी कदापि शक्य नाही. गोटु वाघची संपत्ती तालुक्यातील भल्या भल्यानं घाम फोडणारी आहे अशी देखील चर्चा आहे. मात्र या संपत्ती बाबत द पॉईंट नाऊ पुष्टी करत नाही. खर्च अस असेल तर प्रामाणिक पणे इतक्या जमिनी विकत घेता येत असतील तर , तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना गोटु वाघ ने ही किमया कशी करायची हे सांगावे. जेणेकरून आपला तालुका सुजलाम सुफलाम होईल.

गोटु वाघ याला तालुक्यातील नेते विरोध करत नाहीत, ना सत्ताधारी ना विरोधक नेमकं गोटु वाघ या नेत्यांना खिशात घेऊन फिरतोय की नेते याला घेऊन फिरताय हे न उलगडलेले कोड आहे.

विधानसभेत आ. विनायक मेंटेंनी लक्षवेधी मांडली, मात्र नाशिक जिल्ह्यातील कुठल्याही आमदाराने साधा चकार शब्दही काढला नाही. तालुक्यातील नेते पुढारी मात्र त्याच्या संरक्षणासाठी उतरले होते की काय अशीच चर्चा सर्वत्र आहे.

तालुक्यातील प्रामाणिक नेत्यांची गद्दारांशी बांधिलकी आहे की सर्वसामान्यांन सोबत हे किमान जाहीर करावे. जनता आपल्या भूमिकेची वाट बघतेय. आपण तालुक्याचे किंवा राज्यांचे राजकारण गाजवत असाल मात्र जनतेसाठी उभे आहेत की गद्दार गोटु वाघ सोबत हे सर्वपक्षीय नेत्यांनी जाहीर करावे, किमान पत्रक तरी काढावे असे आवाहन ‘द पॉईंट नाऊ मीडिया’ सर्वपक्षीय नेत्यांना करत आहे.

पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळल्या असत्या तर ?

पोलिसांची मुद्रांक घोटाळ्यातील तपास संशयास्पद राहिला आहे. पोलीस राजकीय दबावाखाली गोटु वाघ ला अटक करत नव्हती अशी चर्चा होती. मात्र या मुजोर घोटाळे बाजाला कलम व्यवस्थित लावले असते तर आज पुन्हा जमीन बळकवणे किंवा धमकी देण्याची हिम्मत नसती झाली. अजूनही पोलिसांनी आपले अधिकार वापरून या मुजोर वाघाच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

पोलिसांनी त्यावेळी योग्य पद्धतीने तपास न करता ढिलाई दिल्याने आणि तालुक्यातील मोठ्या नेत्यांच्या पाठिंब्याने आरोपीचे मनोधैर्य वाढत आहे. आरोपीचे call डिटेल रेकॉर्ड तपासण्याची मागणी वारंवार करूनही एका मोठ्या राजकिय व्यक्तीच्या दबावामुळेच टाळाटाळ केली जात आहे. आजही कॉल डिटेल्स चेक केल्यास खरा मास्टर माइंड समोर येईल आणि अनेकांचे बुरखे फाटतील
— उदयकुमार आहेर
(प्रदेशाध्यक्ष, शिवसंग्राम युवक आघाडी)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here