मुंबई: गेल्या अडीच वर्ष उलटूनही राज्यपालांनी 12 आमदारांच्या यादीवर स्वाक्षरी केली नाही अखेर ती यादी सरकार बदलले अन रद्द झाली अन् आता भाजपा शिंदे यांनी नवीन यादी पाठवण्याची वेळ आली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात उलथापालथ झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे यांच्या सरकारने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी नव्याने पाठवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांसाठी भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
नवीन मिळालेल्या माहितीनुसार या १२ जागांमधील ८ जागा भाजपला (BJP) जातील तर ४ जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी अनेकजण इच्छुक असून यात भाजपच्या वाट्याला ८ जागा येण्याची शक्यता वाढली आहे. या आठ जागांसाठी भाजपकडून नुकतेच अपघातात मृत पावलेले विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), पंकजा मुंडे (Pankaja Munde) चित्रा वाघ (Chitra Wagh) कृपाशंकर सिंह, गणेश हाके, सुधाकर भालेराव यांच्या नावांची चर्चा आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वाट्याला १२ जागांपैकी ४ जागा येण्याची शक्यता आहे. या चार जागांसाठी शिंदे गटातील माजी मंत्री शिवसेनेचे आक्रमक नेते रामदास भाई कदम (Ramdas Kadam) विजय बापू शिवतारे (Vijay Shivatare) जालण्याचे अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) नरेश म्हस्के, चंद्रकांत रघुवंशी, आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) अभिजित अडसूळ ही नावे आघाडीवर आहेत.
येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारा आधी नेमके कोणते नाव समोर येता याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली १२ आमदारांची यादी राज्यपाल कोश्यारी यांनी मंजूर केली नाही त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या १२ जागांसाठी नव्याने यादी पाठवण्याचे निश्चित केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम