
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; तालुक्यात अत्यल्प पावसामुळे नदी नाले कोरडी ठाक पडली असून,आहे त्या पाण्यात रक्षाविसर्जन केल्याने जलप्रदूषण होते. ते टाळण्यासाठी खर्डे येथील आदिवासी बांधवानी आपल्या मातेच्या रक्षा विसर्जनाची राख नदीत न टाकता शेतात खड्डा खोदून त्यात टाकून वृक्षारोपण केले .

आदिवासी बांधवांच्या या नवीन पायंड्याचे कौतुक करण्यात आले . नदींना पाणी नाही, त्यात जे थोडेफार कुठे साचलेले असते त्यात रक्षाविधीची राख टाकली तर तेही पाणी खराब होते. यामुळे जनावरांना पाणी पिण्याची समस्या निर्माण होते. रक्षाविधीची राख नद्यांमध्ये टाकल्यामुळे जलप्रदूषण होते . म्हणून खर्डे ता.देवळा येथील पवार कुटुंबीयांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून तिच्या रक्षाविधीची राख या रोपांना टाकत नवा पायंडा पाडला. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
खर्डे ता.देवळा येथील येथील आदिवासी बांधव व शेतकरी अशोक पोपटे पवार यांच्या मातोश्री बानुबाई पोपटे पवार यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मंगळवार (दि.२१) रोजी रक्षाविधीचा कार्यक्रम होता. अस्थींसह जमा केलेली राख त्यांच्या स्वतःच्या मळ्यात वृक्षारोपण करून टाकत पर्यावरण रक्षणाचा दुहेरी संदेश दिला.
प्रत्येक गावात या पद्धतीने उपक्रम राबवला जावा व आपल्या प्रियजनांच्या आठवणी वृक्षाच्या रुपात जिवंत ठेवाव्यात अशी इच्छा अशोक पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. यावेळी प्रहारचे बापू देवरे ,शिवसेनेचे विभागप्रमुख विजय जगताप ,शशिकांत पवार ,भऊरचे माजी सरपंच मनीषा माळी, रामदास पवार, पंकज पवार, सुमनबाई गोधडे, रंजना वाघ आदींसह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Very good👍