किरण सोनवणे
द पॉइंट नाऊ : देवळा – मालेगाव रस्त्यावर खड्यांमुळे वाहतूकीचे हाल झाले असून पावसामुळे रस्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. त्यामुळे वाहतुचे खुप हाल होतात. वारंवार खड्डे बुंजण्याचे काम प्रशासण करत आहे. पण पावसामुळे परत तिच अवस्था पहायला मिळते. तरी प्रशासनाने या खड्यांचा योग्य निर्णय घ्यावा. आणि लोकांच्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.
रस्त्यावर वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यावर प्रशासन लक्ष घालत नाहीये. पावसाळ्यात सर्व खड्डे पावसाच्या पाण्याने भरून जातात. आणि त्यामुळे वाहनांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तो त्रास कमी करण्यासाठी देवळा प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे काम केले होते. पण पावसामुळे व वाहनांमुळे ते खड्डे परत त्याच स्थितीमध्ये पडतात. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थी, शिक्षका, व्यापारी वाहनांना, एस-टी महामंडळाच्या बसेसला खूप मोठा त्रास होत आहे. त्या खड्ड्यांमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत एसटी महामंडळाच्या बसेस लवकर पोहोचत नाहीये. कारण वाहतूक कोंडीमुळे व खड्ड्यांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झेलावा लागतोय. तरी प्रशासन त्यावर लक्ष घालत नाहीये. प्रशासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. व वाहनांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मार्ग काढावा जेणेकरून विद्यार्थ्यांच शाळा कॉलेज मधील नुकसान होणार नाही. आणि एस-टी महामंडळाच्या बसेस आणि व्यापारी वाहनांना त्रास होणार नाही. आणि ते लवकरात लवकर जास्त अंतर पार करू शकतात असे प्रवाशांनी सांगितले.
प्रवासात विलंब होत असून विद्यार्थ्यांपर्यंत व मार्केट पर्यंत वाहने लवकर पोहोचतील. आणि विद्यार्थ्यांना व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही. वाहनांचे कोणतेही नुकसान होणार नाही. कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही. म्हणून लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन रस्त्याचे नवीन डांबरीकरण करावे. खड्डे बुजवण्यात वेळ वाया घालवू नये. कारण आतापर्यंतची परिस्थिती बघून असे नाही वाटत की खड्डे बुजून वाहतूक योग्यरीत्या चालू शकेल. कारण कितीही वेळा खड्डे बुंजले. तरी खड्डे परत होणारच आहेत. म्हणून सरकारने आता तरी थोडे लक्ष घालावे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम