क्रीडा प्रतिनिधी: स्मृती मंधानाच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियाने पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचा हा पहिला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला केवळ 99 धावा करता आल्या आणि नंतर टीम इंडियाने लक्ष्य सहज गाठले.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी पाकिस्तानचा एकतर्फी सामन्यात 8 गडी राखून पराभव केला. या मॅचमध्ये टीम इंडियाला फक्त 100 रन्सचं टार्गेट मिळालं होतं, प्रत्युत्तरात स्मृती मंधानाच्या धारदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ते सहज साध्य केलं, स्मृतीनं विजयी सिक्स लगावत मॅच संपवली. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचा हा पहिला विजय आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. पावसामुळे सामना 18 षटकांचा करण्यात आला, त्यानंतर पाकिस्तानी संघ भारतीय गोलंदाजांसमोर पत्त्यासारखा कोसळला. पाकिस्तानने 18 षटकात 99 धावा केल्या आणि संपूर्ण संघ बाद झाला. प्रत्युत्तरात भारताने 12व्या षटकात केवळ दोन गडी गमावून विजय मिळवला.
टीम इंडियाची बॅटिंग सुरू झाली तेव्हा स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी टीमला जबरदस्त सुरुवात करून दिली. शेफाली वर्मा 9 चेंडूत 16 धावा करून बाद झाली, यादरम्यान तिने शानदार षटकारही लगावला. शेफाली आणि स्मृती यांच्यात अवघ्या 35 चेंडूत 64 धावांची भागीदारी झाली.
स्मृती मानधनाबद्दल बोलायचे झाले तर तिने अवघ्या 42 चेंडूत 63 धावांची जलद खेळी केली. स्मृतीने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार मारले. बऱ्याच दिवसांपासून मोठ्या इनिंगची वाट पाहणाऱ्या स्मृती मंधानाने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा कहर केला.
या सामन्यात पाकिस्तानच्या नशिबाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की संघाने शेवटच्या पाच विकेट 3 धावांच्या आत गमावल्या. पाकिस्तानची सहावी विकेट 96 धावांवर पडली आणि संघ 99 धावांवर ऑलआऊट झाला.
पाकिस्तानच्या फलंदाजीची अवस्था बिघडली
पाकिस्तानचा संघ अवघ्या 99 धावांत ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर संघाच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. भारताकडून स्नेह राणा, राधा यादव यांनी 2-2 तर रेणुका-मेघना आणि शेफाली यांना 1-1 विकेट मिळाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम