मालेगाव जिल्हा विकासासाठी गरजेचा – सुनील आहेर

0
156

देवळा प्रतिनिधी : राज्यांचे मुख्यमंत्री आज मालेगाव मुक्कामी असून शनिवारी मालेगाव जिल्हा घोषित होण्याची शक्यता वाढली आहे. शासकीय दौऱ्यात देखील मालेगावचा उल्लेख जिल्हा म्हणून केला आहे, मात्र मालेगाव जिल्हयात सहभागी होण्यासाठी देवळा तालुक्यातील बहुसंख्य नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील उर्फ गोटू आबा आहेर यांनी जिल्हा निर्मितीचे स्वागत करत पाठिंबा दर्शवला आहे.

आहेर म्हणाले की, मालेगाव जिल्हा झालाच पाहिजे कारण प्रशासकीय काम करताना सोपे व सुलभ जाईल, मालेगाव जिल्हा झाल्याने सर्वसामान्यांची नाळ मालेगाव शहरासी लवकर जुळेल त्यामुळे मालेगाव जिल्हा होणं हे राजकीय लोकांना जरी धोकेदायक असलं परंतु सर्वसामान्यांसाठी सोयीस्कर होईल असे म्हंटले आहे.

पुढे बोलतांना आहेर म्हणाले मालेगाव साठी सर्वात जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न आहे, यासाठी सर्व मालेगाव जिल्हा एक होईल आणि वांजुळ पाणी मांजरपाडा दोन प्रकल्पासाठी निर्णय घेणे सोपे होईल, परिणामी दुष्काळी भागाचा विकास होऊ शकतो असे मत आहेर यांनी व्यक्त केले.

मालेगाव जिल्हा निर्मितीवर आज समिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, भाजपचे आमदार राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी मात्र देवळा तालुका मालेगांव मध्ये सहभागाला विरोध केला आहे. उद्या कदाचित देवळा तालुका सहभागी केल्यास देवळ्याच्या नेत्यांमधील फूट नागरिकांच्या भावनेची कदर करत एक होणार का हे बघण्यासारखे असेल.

सर्वसामान्यांच्या कडाडून विरोध…..

देवळा चांदवड मधील नागरिकांनी मालेगाव जिल्ह्यात सहभागी होण्यास तीव्र विरोध आज दिवसभर दर्शवला आहे, नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला असून लोकप्रतनिधींनी यात हस्तक्षेप करावा असे आवाहन देखील नागरिक करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here