केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजने बाबत घोषणा केली आहे. या योजनेनुसार फक्त ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद (Sanjay Raut) उमटताना पाहायला मिळत आहे.
या योजनेवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करणं हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माध्यमां सोबत बोलताना खा. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, “मोदी सरकारची अशा प्रकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. मोदी सरकारने आता १० लाख, २० लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. त्याआधी त्यांनी २ कोटी, १० कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. महागाई कमी करण्यासाठी आता त्यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली.”
हे सुद्धा वाचा :-
रेडिओअॅक्टिव्हिटी संशोधन करणाऱ्या महिलेला गूगलकडून मानवंदना
“सैन्य पोटावर चालतं, सैन्याला एक शिस्त असते. सैन्यामध्ये ठेकेदारी पद्धतीने भरती होणार असेल तर देशात भारतीय सैन्याची जी प्रतिष्ठा आहे, ती रसातळाला जाईल. ठेकेदारीवर गुलाम किंवा सध्याचा मीडिया घेतला जाऊ शकतो. पण सैन्य कंत्राटी पद्धतीने कसं काय घेतलं जाऊ शकतं?” असा सवालही (Sanjay Raut) त्यांनी उपस्थित केला आहे.
सैन्यावर संपूर्ण देशाची जबाबदारी आहे, त्यांना कंत्राटी पद्धतीनं कसं काय घेतलं जाऊ शकतं. हा संपूर्ण भारतीय सैन्य दलाचा अपमान असल्याचे सांगत राऊतांनी अग्निपथ योजनेवरुन (Sanjay Raut) मोदी सरकारवर निशाणा साधला.
नवाब मलिक, देशमुखांना धक्का ; मतदानाचा अधिकार नाहीच
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम