
– सोमनाथ जगताप
देवळा: खर्डे ता देवळा येथे शुक्रवारी(१०) रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने येथील शेतकरी तानाजी महादू गांगुर्डे यांच्या घरालगातच्या शेडवरील पत्रे उडून कांदे भिजल्याने जवळपास साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

तलाठी उमेश गोपणारायन यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला असून, गांगुर्डे यांनी तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,शुक्रवारी (१०)रोजी खर्डे ता देवळा येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. वादळ वारा जोरात असल्याने शेड ,कांदा चाळीवरील पत्रे उडाली आहेत . तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली . या पावसात काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे . खर्डे येथील प्रगतिशील शेतकरी तानाजी गांगुर्डे यांच्या राहत्या घराजवळील शेडचे पत्रे उडाल्याने शेड मधील कांदा भिजल्याने गांगुर्डे यांचे जवळपास साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज तलाठीने केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आला आहे .
खर्डेसह ,कणकापूर, वार्षी ,वडाळा ,शेरी परिसरात पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनावेग आला असून, शेतकरी वर्ग अजून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम