द पॉईंट नाऊ ब्युरो : देशात वाढत्या बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांनी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. झारखंड राज्यात बलात्कार करणाऱ्या तरुणांना संतप्त जमावाने जिवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एक तरुणी आपल्या आईसोबत एके ठिकाणी गेलेली असतांना तरुणांनी तरुणीवर बलात्कार केला. यामुळे तरुणीच्या नातेवाईकांनी संतप्त होत, सदर तरुणांना गावात आणले व त्यांच्या दुचाकीसह त्यांना जिवंत जाळले. एवढ्यावरच न थांबता ग्रामस्थांनी तरुणांवर धारदार शस्त्रांनी हल्ला देखील केला. झारखंड मधील गुमला जिल्ह्याच्या बसुआ आंबाटोली गावात बुधवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एकास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमी झालेल्या तरुणाने आपण तरुणीसोबत काहीही गैरकृत्य केले नसल्याचे पोलिसांना सांगितल्याचे बोलले जात आहे. आता पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या कारणाने पोलीस गावात तळ ठोकून आहेत. आता पोलिसांच्या तपासात नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशात मागील काही दिवसांत बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. यामुळे देश पुरता हादरला आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतप्तता पसरली आहे. मात्र या संतप्ततेचे पर्यवसन दोघांच्या थेट जीवावर उठले आणि त्यांना भयंकर घटनेस सामोरे जावे लागले. यात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा मृत्यूशी झुंज देत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम