कोविडनंतर दारू विक्रीसंदर्भात पुन्हा महत्वपूर्ण निर्णय; शासनाचे उत्पादन शुल्क विभागाला आदेश

0
26

द पॉईंट नाऊ ब्युरो : राज्य सरकारने दारूविक्री संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता तळीरामांना घरपोच दारू भेटणार नाही. कोविड काळात आवश्यकतेअनुसार घरपोच दारू पोहचण्यास परवानगी दिली होती.

कोविड काळात सर्वच प्रकारच्या संसाधनांसह दारूची दुकानही बंद होती. मात्र काही दिवसात ती सुरू करण्यात आल्यानंतर प्रचंड प्रमाणात गर्दी होऊ लागली होती. यामुळे कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका होता. यामुळे प्रादुर्भाव वाढू नये व दारू विक्री करणाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी हा दारू घरपोच विक्रीची परवानगी दिली होती.

मात्र आता कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दारूची दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. याच कारणास्तव आता घरपोच दारू विक्रीचा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनाने उत्पादन शुल्क विभागाला आदेश दिले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here