मुंबई प्रतिनिधी : मुंबईमध्ये प्रवास करत असताना अनेक नियम पाळावे लागतात आता त्यात एका नवीन नियमाची भात पडली आहे. आता दुचाकीस्वाराबरोबरच प्रवास करताना मागे बसणाऱ्या व्यक्तीस हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे.
मोटरसायकवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी हेल्मेट वापरणे आता बंधनकारक असणार आहे. या नियमाचे पालन न केल्यास कारवाई होऊ शकते. येत्या १५ दिवसामध्ये ही अंमलबजावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी या बाबतची परिपत्रके जारी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच प्रमाणे गाडीवरील व्यक्तीने हेल्मेट न वापरल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल तसेच ३ महिन्यांकरिता लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम