द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यात महगाईने सर्व सामन्यानची कंबर मोडली असतानाचा त्यातून दिलासा मिळत असल्याचे दिसून येते. काही महिन्यानंतर देशांतर्गत होणाऱ्या बाजारात मोहरी, सोयाबीन, शेंगदाणे, पामोलिनसह सर्व खाद्यतेलाचे दर कमी होताना दिसत आहेत. प्रत्येकी खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये प्रतिलिटर ७ ते १० रुपयांनी घसरण झाल्याने महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने पेट्रोल, डीझेलच्या दर कमी केल्यानंतर लगेचच त्यापाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती देखील कमी झाल्याने महागाईमुळे कोलमडलेल बजेट सुरळीत होत असल्याने सर्व सामान्य सुटकेचा निःश्वास सोडत आहेत.
स्थानिक बाजारपेठांमध्ये तेलाची मागणी सोयाबीन, सरकी, भुईमूग, आणि मोहरीच्या तेलावर भागवली जात आहे. मात्र आता इंडोनेशियाकडून २३ मे पासून भारतावरील होणाऱ्या पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी काढल्याने सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या किंमती जवळजवळ १०० डॉलरने घसरल्या आहेत. यामुळे आयातीला सुरुवात झाली असून काहीच दिवसांत इंडोनेशियातून तेलाची आवक सुरळीतरित्या झाल्यास खाद्यतेलाच्या किंमती आणखी घसरतील, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम