द पॉइंट नाऊ ब्युरो : मागील काही दिवसांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडून बऱ्याच लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता चंद्रपूर मधील अजयपूर गावा नजीक दोन ट्रकचा भीषण अपघात होऊन 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर-मूल रस्त्यावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाल्याने, आग लागली. या आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातातील एक ट्रक हा पेट्रोल वाहतूक करणारा आणि एक ट्रक हा लाकडाची वाहतूक करणारा होता. या दोन्ही ट्रकची धडक झाल्यानंतर टायर फुटल्याने आग लागली. आणि यात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीच्या ज्वालांनी जंगलातील अनेक झाडे देखील जळून खाक झाली आहेत. दरम्यान, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम