– अंकुश सोनवणे-पाटील
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; त्र्यंबकेश्वर देवस्थान सध्या वेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहे. दोन दिवसांपूर्वी देवस्थानचे त्रिकाल पूजक सत्यप्रिय शुक्ल महाराज व पुजारी(गुरव) कैलास देशमुख यांच्यात खडाजंगी झाली असून देशमुख यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोप माजी विश्वस्थ ललिता शिंदे केला आहे, तर सत्यप्रिय महाराजांनी हा आरोप फेटाळून लावले आहे.
शिंदे यांच्या मते 7 सप्टेंबर रोजी सकाळी मंदिरात रोजच्या प्रमाणे विधिवत पूजा चालू असताना देवस्थान चे त्रिकाल पूजक श्री सत्यप्रिय शुक्ल यांनी मानाच्या पाटावर बसून क्षुल्लक कारणावरुन पुजारी (गुरव) कैलास नामदेव देशमुख यांना आई बहिणी तसेच वर्ण अतिशय खालच्या पातळीला जाऊन शिवी गाळ केली असा आरोप देवस्थानचे माजी विश्वस्थ ललिता शिंदे यांनी केला आहे.
पूजा चालू असतांना पाटाचा मान व जुने संबंध लक्षात घेऊन कैलास देशमुख यांनी संयम राखत त्या ठिकाणी शांत रहाण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे.
शुक्ल हे जातीवरून बोलले “मराठयांचे दिवस आता संपले आहेत”. मुळात गर्भ गृहात असे बोलणं कित पत योग्य आहे हे देखील समजलं पाहिजे त्यानंतर शुक्ल यांचा पारा सुटला व नेहमी प्रमाणे जवळ च असलेला घंटा कैलास देशमुख यांच्या दिशेने फेकून मारल्याचा आरोप शिंदेंनी केला आहे. या आरोपांमुळे सध्या देवस्थान परिसरातील राजकारण चांगलेच तापले आहे.
शुक्ल यांनी मारून फेकलेला घंटा कैलास यांना सुदैवाने लागला नाही सत्यप्रिय शुक्ल यांची पाश्वभूमी ही नेहमी वादात अडकली आहे, यापूर्वी देखील गावातील नामांकित पुरोहित असलेले व्यक्ती यांना देखील असच केलं आहे त्याची रीतसर पोलीस ठाण्यात नोंद देखील आहे. एका व्यक्तीला तर अक्षरशः रक्तबंबाळ केलं आहे त्या मुळे हा कसला प्रकार आहे आणि आज तर चक्क अर्धी पूजा सोडून पाटावर बसून बाहेर जाण. परत सोहळे नेसून आत येन हा देवाचा देखील अपमान आहे , सर्व गाव त्यांना एक मुख्य पूजक म्हणून जो मान देतो आहे, त्यांनी त्या पाटाचा देखील अपमान केला आहे ज्या कैलास देशमुख यांना शिवीगाळ केली ते देखील एक शांत व्यक्तिमत्व आहे. त्यांनी देवाच्या गर्भ गृहात पाप नको म्हणून त्यांनी बाहेर जाऊन बसण्याचा प्रयत्न केला तर शुक्ल हे त्यांच्या मागे पूजा सोडून धावत सुटले आणि बाहेर येऊन सोहळ्यावर देवाच्या दारात तमाशा मांडला आहे असा सनसनाटी आरोप देखील शिंदेंनी केला आहे.
कैलास देशमुख यांची चुकी होती तर एव्हढ्या मोठया पदावर असलेली व्यक्ती पूजा आवरून कैलास ला बाहेर समजून सांगू शकत होती पण तस न करता आई वर्ण व अतिशय अश्लील शिव्या शुक्ल यांनी दिल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.
ज्या पूजेच्या नावाखाली शुक्ल हे सर्व करता तीच पूजा अर्धवट कशी सोडू शकता हे न समजण्या पलीकडचं आहे, आमची जात मराठा आहे आम्हाला शिवरायांच्या मार्फत हे वतन मिळालं आहे हे जर शुक्ल यांच्या डोळ्यात खुपत असेल तर त्यांनी तस स्पष्ट सांगावं अस पाठीमागून वार करू नये समोरा समोर वार करावे म्हणजे आम्ही पण आमच्या मूळ स्वभावात येऊ आणि होऊन जाऊद्या एकदाच काय ते आमच्या कडे पण नामोळ्या आहे सर्वांच्या त्या बाहेर काढायला लावू नका असा सज्जड दमच शिंदे यांनी भरला आहे.
मुळात शुक्ल यांना गर्भ गृहाचे म्हत्वचं कळलं नाही बहुतेक आज असंख्य लोकांना दर्शनापासून दूर राहावं लागतं आहे ह्या व्यक्तीला तर रोज देवाची पूजा करायला मिळते आहे तर त्या व्यक्तीने किती सुंदर हे काम केले पाहिजे पण तस न करता लोकांच्या आई बहिणी चा देवा पुढे उद्गार करून ह्या व्यक्तीला काय साध्य करायचे आहे मुळात कैलास देशमुख यांची आईच वय 70 आहे त्या सध्या हंथरूनला खिळवून आहे त्या माईचा उद्गार करून काय मिळवर शुक्ल यांना असा सवाल देखील शिंदेंनी विचारला आहे.
सत्यप्रिय शुक्ल महाराज यांच्याशी आम्ही संवाद साधून त्यांची बाजू समजून घेतली असता मंदिराच्या गर्भगृहात जातिवादाचा संबंध नाही. नवीन चेअरमनांनी काही बदल केलेत. इंटेलिजन्स ब्युरोच्या सुचनांनुसार त्यांनी दक्षिण दरवाजा (गायत्री मंदिरा) जवळचा त्याचा ताबा घेतला. जो ताबा आधी तुंगारांकडे होता. सरकारी आदेश नुसार चेअरमनांनी बदल केले, या सर्व बाबींमुळे देशमुख यांचे आर्थिक नुकसान झाले असावे म्हणून फस्ट्रेशन मध्ये आले असावेत. यामुळे त्यांनी मला चेअरमनांच्या जवळचे समजून टार्गेट केलं जातंय. मंदिर हा राजकारणाचा अड्डा नाही त्यामुळे इथे जातीवाचक कल्पना देखील डोक्यात येणारा नाही.
त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली, माझ्यासह चेअरमन यांचा देखील बाप काढला अर्वाच भाषेत शिवीगाळ केली, मी मात्र संयम बाळगला , त्यांनी माझ्यावर आरोप केले तेव्हा मी काय शिव्या दिल्या अस विचारले असता देशमुख यांनी सांगितले की तुम्ही मागे शिव्या दिल्या होत्या त्यामुळे या आरोपात काहीही तथ्य नाही असा दावा शुक्ल महाराज यांनी केला आहे.
असा संकेत आहे की पूजक यांची पूजा झाल्यानंतर गुरव लोकांनी पूजेला स्पर्श केला की पूजा मोडत असते, मग देशमुखांनी पूजेला हात घालून पूजा नियमानुसार खंडित झाली. यामुळे मी व्यथित झालो व मी कोठी संस्थांमध्ये गेलो असतांना त्या ठिकाणी ललिता शिंदे आल्या व त्यांनी सर्व मर्यादा ओलांडून बोलन सुरू केलं. मंदिरात त्यांनी संस्थानचा अपमान केला आहे. शुक्ल यांच्यामते माझी पूजा सुरू असताना देशमुख यांनी यायचा संबंध नसतांना देशमुख का आले. असा सवाल देखील शुक्ल यांनी केला आहे.
चेअरमन विकास कुलकर्णी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून. मी मंदिराची पूजा करत होतो त्यात माझा वैयक्तिक स्वार्थ नाही, या प्रकरणात संस्थांनची बदनामी झाली आहे. याचा निर्णय चेअरमन घेतील, त्या संदर्भात तातडीची बैठक बोलवण्या संदर्भात चेअरमन निर्णय घेतील अशी माहिती शुक्ल महाराज यांनी दिली आहे.
काय आहेत पूजेचे नियम
दिवसातून तीन वेळा पूजा होते, यात सकाळी ब्राम्हदेवांची पूजा असते, दुपारी शंकरांची तर सायंकाळी विष्णूंची पूजा होत असते जगात अशी पूजा कुठेही होत नाही. हे त्र्यंबकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य आहे. या पूजेचे नियम आहेत.पुजारी हा संस्कृत शब्द आहे, याचा अर्थ पूजा + अरी , अरी या शब्दाचा अर्थ शत्रू किंवा मोडणारे असा अर्थ आहे, पूजा मोडणारे पुजारी , पूजकांची पूजा झाल्यानंतर पुजाऱ्यांनी हात लावायचा असतो. मात्र काल हे सर्व नियमा विरोधात घडले आहे. असा दावा महाराजांनी केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम