जळगाव जिल्ह्यातील कोठली रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत उशिरापर्यंत भडगाव पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली.
भडगाव -कोठली रस्त्यावर मयुरेश लॉन्सजवळ बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी झाला. टँकरचा वेग जास्त असल्याने नियंत्रण झाले नाही आणि हा अपघात घडला आहे. अपघातात त्यात जागीच तिन जणांचा मृत्यु झाल्याची घटना घडली. अनेक प्रयत्नातून उशिरापर्यंत पर्यंत मयताची ओळख पटली. .
दरम्यान त्यातील एक यशवंतनगर, दुसरा टोणगावातील तर तिसरा जुन्या भडगाव शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते. तर उशिरापर्यंत अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते. ट्रॅक्टर कसे पलटी झाले हे समजु शकले नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम