आंब्यांचे मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. कोकणातील हापूसचा हंगाम अंतिम टप्यात आला आहे. 25 मे पर्यंत बाजारात हापूसची आवक बाजारात राहणार आहे. त्यानंतर मात्र आंब्याची आवक तुरळक होणार असून इतर गावरान आंबे बाजारात उपलब्ध होणार आहे.
यामुळे यंदाच्या हंगामचा शेवटचा टप्पातील हापूसची चव चाखण्यासाठी काही दिवस उरले आहे. सद्य:स्थितीत बाजारपेठेत घाऊक आणि किरकोळ हापूसचे दर कमी आहेत. जास्त प्रमाणात आवक वाढल्यामुळे हापूसच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. किरकोळ बाजारात 1 डझन हापूसचा दर 200 ते 400 रुपये एवढा आहे .
देवगड हापुस 900 ते 1400 रुपये डझन या दराने मिळत आहे. तर, रत्नागिरी हापूस 1200 ते 1600 रुपये डझन या दराने दिला जात आहे. वातावरणातील तापमान वाढ, ढगाळ वातावरण, वादळ आणि अवकाळी पावसाच्या चिंतेने शेतकरी हापूस आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारात पाठवत आहेत. आंबा बाहेरून तापत असून तो आतून पांढरा होण्याची भीती आहे.
घटलेले दरामुळे आंब्याची आवक कमी होईपर्यंत कायम राहणार आहे. तर त्यानंतर इतर गावरान व कर्नाटकी आंबा बाजारात येईल. मात्र हापूसचे आंब्याचे दर काहीप्रमाणात घटल्यामुळे सर्वसामान्य दिलासा मिळाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम