मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी पहाटे खेड येथे भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडे जात असताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. कार चालकाचा मृत्यू झाला तर अन्य ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग खवटी रेल्वे पुलाजवळ ही दुर्घटना घडली.अपघातात किशोर अनंत चव्हाण (वय-४८, रा. धामापूर, संगमेश्वर) यांचा जागीच मृत्यू झाला. रत्नागिरीहून मुंबईदिशेने जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने चार चाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला मागून धडकली. इतकी भीषण होती की या गाडीचा चक्काचूर झाला. कार चालकाला उपचाराकरिता नेले असता डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले. सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी खेड येथे उपचार सुरू आहेत.
अपघातग्रस्त वाहनातील अन्य ७ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती कळताच कशेडी टॅब येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यामध्ये बोडकर, समेल सुर्वे आदी पोलिसांचा समावेश होता. त्यामुळे महामार्गावर वाहनांची कोंडी झाल्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम