आराई येथील शिवारात अचानक लागलेल्या आगीत हजारो रुपयांचे नुकसान

0
7

स्वप्नील अहिरे , आराई प्रतिनिधी : बागलाण तालुक्यातील आराई गावालगत शिवारातील गट नंबर १० मध्ये प्रभाकर मोतीराम सोनवणे यांच्या खळ्यात १० ते १२ ट्रॉली मक्याचा चारा ठेवलेला असताना अचानक लागलेल्या आगीत सर्व चारा भस्मसात झाला.

अचानक लागलेल्या आगीमुळे आग विझवण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली होती. सर्व चारा जळाल्यामुळे आजच जनावरांसाठी चारा नसल्याने मोठं संकट त्यांच्यावर ओढवले आहे. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला पाचारण केले. सगळीकडे कांदा काढणीचे काम सुरू असल्याने शेतकरी कामात व्यस्त असल्यामुळे मदत कार्यात अडचणी निर्माण झाल्या. मदत उपलब्ध होण्याच्या आतच आगीने रौद्ररूप घेऊन चाऱ्याचे होत्याचे नव्हते केले.

अग्निशामक पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. तरीही स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी मोठ्या शर्तीने चारा वाचवण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी डॉ.गोकुळ अहिरे, माधव तात्या अहिरे, परशुराम आहिरे, नंदकुमार अहिरे, प्रभाकर सोनवणे,अशोक सोनवणे, शांताराम सोनवणे, मनेश सोनवणे, सुरेश अहिरे, गणेश अहिरे , रामदास अहिरे, ग्रामपंचायत लिपिक स्वप्निल अहिरे, भारत अहिरे, वसंत भदाने, रोशन सोनवणे आदींसह नागरिक उपस्थित होते. सटाणा अग्निशामक विभागप्रमुख संदिप पवार, कर्मचारी भूषण सोनवणे, दत्तात्रेय नंदाळे, बापू नंदाळे, विवेक देवरे आदींनी मोठी मेहनत घेतली. अज्ञात व्यक्तीने केलेल्या कृत्यामुळे आज माझ्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना आजच खायला चारा नाही. माणसाचं होईल पण मुक्या जनावरांचे काय होईल त्यांच्या चाऱ्याची चिंता आहे. प्रभाकर सोनवणे नुकसानग्रस्त शेतकरी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here