शाळांमध्ये 15% फी सवलत, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

0
27

कोरोना काळात सर्वसामान्य जनतेचे आर्थिक परिस्थिती ढासळली आणि बरेच विद्यार्थ्यांना शालेय फी भरणे शक्य नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र शिक्षण विभागाने 15 टक्के फी कपात करण्याचे आदेश दिले होते. परंतु शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेश डावलून पूर्ण फी घेतली आहे. यावरूनच पुन्हा एकदा पत्रक शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने शाळेतील 15 टक्के फी कपात करण्याचे शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश दिले. शिक्षण विभागाने शाळांना देखील लागू होतात. कोरोना काळात वर्ष 2021 मध्ये शिक्षण विभागाने 15 टक्के फि माफ करण्यासाठी आदेश दिले होते. परंतु शाळांमधील कोणतीही फी कमी न केल्याने पालकांमध्ये संतापजनक वातावरण आहे.

पुन्हा एकदा शिक्षण विभागाने 15 टक्के फी कपात करा नाही तर पुढच्या वर्षात सामावून घ्या, असे सांगितले आहे. कोरोनामध्ये आर्थिक परिस्थिती ढासळली आणि विद्यार्थ्यांच्या साठी पालकांना तडजोड करावी लागत आहे त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांचा समावेश असलेल्या मुंबईच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना हा आदेश देण्यात आला आहे.

 

 

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here