द पॉईंट नाऊ ब्युरो : लग्न आटोपून निघालेल्या वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात होऊन 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील रामपूर येथे ही दुःखद घटना घडली.
मुरदाबाद येथील सहा जण लग्न आटोपून आपल्या घरी परतत असताना भीषण अपघात घडला. ज्यात पाच जणांना जागीच मृत्यूने कवटाळले. तर यात चालक हा गंभीर जखमी झालेला आहे.
हे सर्व जण कारमधून आपल्या घरी परतत होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार ट्रकचा अपघात झाला. काळाने घाला घातला आणि या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम