Maharashtra| केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारही ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देत आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे आणि अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत मागच्या दोन महिन्यांपासून सूचना करण्यात येत होत्या. दरम्यान, राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी पीएम किसान तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरलेले आहेत.
कृषी, महसूल, भूमी अभिलेख इत्यादि विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करणे अशा बाबींची पूर्तता झाली असून, राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी या दोन्ही योजनांसाठी पात्र ठरले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम