द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : जग बुडी होणार हे आपण नेहमी हसण्यावर घेत असतो मात्र आता सत्यात उतरण्याची परिस्थिती दिसू लागली आहे. त्याला कारणही तसंच आहे. संपूर्ण जग सध्या धोक्याच्या उंबरठ्यावर उभं असल्याचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयपीसीसीच्या अहवालावरून स्पष्ट झालंय. त्यावरून आता पुन्हा जगबुडीच्या चर्चेला तोंड फुटलंय, विशेष म्हणजे बदललेल्या पर्यावरणीय परिस्थितीमुळे सर्वाधिक धोका भारताला असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आपण बघतोय मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो, शाश्वत विकासासाठी आग्रही असलेल्या आणि शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करून जगाचं कल्याण व्हावं असं स्वप्न पाहणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानं जगाची झोप उडवलीय. त्यात भारत सध्या धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय उपखंडाला मोसमी पावसाचे वरदान ठरणारा आणि भारतीयांचा आधार असलेला हिंदी महासागर सध्या ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्टचक्रात अडकलाय. जगाच्या अनेक राष्ट्रांत तापमानवाढीचे संकट किती भयावह असेल ही तर दूरची गोष्ट आहे. पण जगबुडीच्या आधी भारतालाच हवामानबदलाचा धोका अधिक असल्याचे “इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज”च्या अहवालाने स्पष्ट झालंय. यामुळे भारतासह जगाला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.
देशात अनेक क्रांतिकारक बदल झालेला आपण बघतो मात्र त्याच बरोबर विकासाचा एक टप्पा गाठत असताना धोकाही तितकाच वाढतोय हे आता जाणवू लागलंय. यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर मुंबईसह महाराष्ट्रातल्या काही भागात अतिवृष्टीचा तडाखा बसला. काही ठिकाणी महापुराचा ही सामना करावा लागला. पश्चिम घाटासारख्या अभेद्य सह्याद्रीरांगाही हळूहळू कोसळू लागल्यात. महाराष्ट्रातली ही स्थिती असताना हिमालयातील आस्मानी संकटाने अर्ध्या देशाला कवेत घेतलंय. यामुळे चिंता वाढवणारी ही घटना आहे.
जगात मानवाचा अति हस्तक्षेप आणि पर्यावरणाच्या साखळीला रोखत चालल्यानं निसर्गचक्र बिघडल्याचे दिसू लागले आहे. प्रशांत, अटलांटिक किंवा अन्य महासागरांच्या तुलनेत हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान अधिक वेगाने असल्याने समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी ३.७ मिलीमीटरने वाढत आहे. सध्याच्या वेगाने एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत तीन फुटाने वाढेल व त्यामुळे समुद्रकिनारे पाण्याखाली येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
पर्यावरणाकडे केलेलं मानवाने जाणून बुजून दुर्लक्ष जगाला भारी पडणार आहे. सध्या देशात 2020-21 या वर्षांमध्ये हवामानातील बदलावर जगभर संशोधन करण्यात आले. त्यानंतर क्लायमेट चेंज 2021 हा अहवाल आल्यानंतर आता प्रत्येक देशाच्या पायाखालची वाळू सरकलीय. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आयपीसीसीसोबत एक टूल तयार केले आहे. त्यात 2020 ते 2015 पर्यंत दर दशकात पृथ्वीवरील समुद्राची पातळी कशी कशी वाढत जाईल व कोणता भाग पाण्याखाली येईल हे लवकरच कळेल.
भारतातील ह्या शहरांना धोका सर्वाधिक
कांडला, ओखा, भावनगर, मुंबई, मुरगाव, मंगलोर, कोची, तुतीकोरीन, चेन्नई, विशाखापट्टणम, पारादीप, किद्रोपार ही शहरे पाण्याखाली येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आलीय. यामुळे भारताने वेळीच पाऊले उचलणे गरजेचं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम