स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत रा.से. यो. स्वयंसेवकांचे योगदान – ठाकरे

0
41

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महात्मा गांधींच्या विचारातून व पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रेरणेने २४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी युवक व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना या योजनेद्वारे राष्ट्र उभारणीत सामील करून घेऊन स्वच्छता,साक्षरता,अंश्रद्धा निर्मूलन व खेड्यांचा विकास याकामी पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देण्याचे ठरले.

देवळा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.सतीश ठाकरे आदी (छाया – सोमनाथ जगताप )

आज लाखो स्वयंसेवक योजनेत भाग घेऊन राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे योगदान देत आहेत . असे प्रतिपादन प्रा सतीश ठाकरे यांनी केले . येथील कर्मवीर रामरावजी आहेर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवारी( दि २४) रोजी “राष्ट्रीय सेवा योजना ” स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.सतीश ठाकरे यांनी स्वयंसेवकांना या योजनेच्या निर्मिती मागील इतिहास,उद्दिष्टे आणि महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डी.डी.आहेर हे होते. या व्याख्यानातून डॉक्टर ठाकरे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना देशाच्या बदलत्या परिस्थितीत निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाताना स्वयंसेवक काय काय करू शकतो हे उदाहरणासह सांगितले. अशोक गुजरे यांनी प्रास्ताविक केले. तर कु.वैष्णवी शेवाळे हिने उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास माजी कार्यक्रम अधिकारी एस एम अहिरे, यु के शेळके, आर.एन.शिरसाठ, जेष्ठ शिक्षक यु आर वाघ,श्रीमती एन वाय पाटील,इतर सहकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here