सरपंच हा गावाचा दुवा ; उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख

0
38
देवळा महाराष्ट्र शासन,नाशिक विभागीय आयुक्त विभाग व एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका सरपंच संसदेप्रसंगी मार्गदर्शन करताना अटल भूजल योजनेचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक जीवन बेलणार समवेत प्रांत अधिकारी चंद्रशेखर देशमुख,तहसीलदार विजय सूर्यवंशी,गटविकास अधिकारी राजेश देशमुख आदी (छाया: सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : गाव विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडे विविध विभागांमार्फत योजना राबवल्या जातात.त्या योजनांची परिपूर्ण माहीती ग्रामपंचायतीपर्यत पोहचत नाही.सरपंच हा गावाचा दुवा असतो.अधिकारी आणि नागरीकांना एकत्र जोडण्याचा गावचा सरपंच एक धागा आहे.शासनाकडे योजनांची कमी नाही.शासन बांधावर जाऊन मदत करते. यासाठी सरपंच संसद परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्याचा लाभ सरपंचांनी आपल्या गावांसाठी करून घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी केले.

देवळा महाराष्ट्र शासन,नाशिक विभागीय आयुक्त विभाग व एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका सरपंच संसदेप्रसंगी मार्गदर्शन करताना अटल भूजल योजनेचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक जीवन बेलणार समवेत प्रांत अधिकारी चंद्रशेखर देशमुख,तहसीलदार विजय सूर्यवंशी,गटविकास अधिकारी राजेश देशमुख आदी (छाया: सोमनाथ जगताप )

देवळा प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात महाराष्ट्र शासन, नाशिक विभागीय आयुक्त विभाग व एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा तालुका सरपंच संसदेचे (२४) रोजी आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी प्रांत आधिकारी चंद्रशेखर देशमुख ,गटविकास अधिकारी राजेश देशमुख, अटल भूजल योजनेचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक जीवन बेलणार ,एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील,सहमसमन्वयक प्रकाशराव महाले यांनी मार्गदर्शन केले.

सरपंच संसद परिषदेमध्ये गावा गावातील सरपंचांनी समस्यांचा पाडा वाचला. यात डोंगरगावं येथील सरपंच दयाराम सावंत यांनी गावातील पाणंद रस्ता, वीज ,एसटी बस सेवा ,रेशनकार्ड ,जातीचे दाखले ,संजय गांधी निराधार योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्यासाठी गावागावात कॅम्प आयोजित करण्याबाबत गरज व्यक्त केली.शेतकऱ्यांना अतिक्रमणामुळे शेतीमाल विक्रीसाठी नेण्यास अडचणी येतात.

मातोश्री पाणंद योजना राबवण्यासाठी प्रांत अधिकारी व तहसिलदारांनी ही योजना राबवण्यासाठी सरपंचांना सहकार्य करण्याची अपेक्षा लालजी सावन्त यांनी व्यक्त केली . घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व शासनाच्या योजनांची माहीती सरपंचांना मिळण्यासाठी अधिकारी व सरप़चांची महिन्यातून एकदा बैठक झाली पाहीजे अशी अपेक्षा देवळा तालुका समन्वयक व रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार यांनी व्यक्त केली. बहुतांश गावातील सरपंचांनी आपल्या गावातील समस्या मांडल्या. प्रांत देशमुख यांनी सरपंचांना मार्गदर्शन केले. सरपंचांना गावचा विकास साध्य करण्यासाठी सरपंच संसदेने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

अधिका-यांना भेटून गावच्या समस्या सरपंचांनी मार्गी लावून घ्याव्यात असे आवाहन देशमुख यांनी केले.
कार्यक्रमास तहसीलदार विजय सूर्यवंशी , नायब तहसिलदार विजय बनसोडे , तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे ,आरोग्य अधिकारी डॉ सुधीर पाटील ,गोविंद पगार, विस्तार अधिकारी जयंत भामरे, संजय मोरे,गोरक्षनाथ केदार,डॉ संजय शिरसाठ, अड तुषार शिंदे ,सुनील शेवाळे, रवींद्र आहेर ,हेमंत पवार, सतीश गुंजाळ ,राहुल देवरे आदीसह आजी,माजी सरपंच, उपसरपंच सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमआयटी सरपंच संसदेचे समन्वयक योगेश पाटील यांनी तर आभार वाजगावचे उपसरपंच दीपक देवरे यांनी मानले . सुत्रसंचालन गोविंद पगार यांनी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here