सरकारला किती आत्महत्या हव्यात ? ; एसटी कर्मचारी मृत्यूच्या खाईत

0
206

द पॉंईंट नाऊ प्रतिनिधी : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असतांना अजून एका एसटी महामंडळमधील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. चंद्रपूर शहरात राहणारा हा रहिवासी असून त्याने विष प्राशन करत हि आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.

चंद्रपूर शहरातील प्रमुख आगरामध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून काम करणाऱ्या सत्यजित ठाकूर यांनी आज आपली जीवनयात्रा संपवली आहे.

आत्महत्या करणारे सत्यजित ठाकूर ३४ वर्षांचे होते. त्यांना चार महिन्यांची मुलगी आहे. त्यांची पत्नी नागपूरला राहत असून त्यांनी तेथून फोन केला असता त्यांचा फोन स्विच ऑफ येत असल्याने त्यांना शंका आली आणि त्यांनी चौकशी सुरु केली.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून संप पुकारला आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. याआधी देखील अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याआधी संप करण्यात आला होता तेव्हा देखील एसटीला गळफास लावून कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे.

राज्यात प्रवाशी मात्र बेहाल झाले आहेत, कर्मचाऱ्यांच्या संपाने सरकार सावध भूमिका घेत आहे. तर विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने आंदोलन चिघळले आहे. या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. सरकारचे अपयश यात उघड झाले आहे तर राजकीय पक्ष देखील आपली पोळी भाजून घेत आहेत.

खाजगी वाहतुकीच्या फेऱ्या मात्र महागल्या आहेत, यात प्रवाशांची लयलूट मोठ्या प्रमाणात सुरू आहे, यात ना सरकारचे लक्ष न विरोधकांचे परिवहन विभाग मात्र कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही. महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू असल्याने ऐन सणासुदीला हे आंदोलन चर्चेचा विषय आहे. तर प्रवाशांना मात्र आर्थिक भुर्दंड भरावा लागला आहे.

सरकारने लक्ष घालून हा संप संपवावा ही मागणी प्रवासी करत आहेत. सणासुदीला प्रवाशांना हा मनस्ताप सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे सहन करावा लागतोय. एका बाजूला संघटना तर दुसऱ्या बाजूला सरकार यांच्या युद्धात मात्र प्रवाशांचे हाल झाले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here