द पॉईंट नाऊ ब्युरो : शेतकरी वर्ग पुन्हा एकदा हवालदिल झालेला दिसून येतो आहे. भाजीपाल्याचे भाव पूर्णतः गडगडल्याने आता भाजीपाला थेट जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
नागपूरमधील कळमेश्वर मार्केट येथे भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आणि आवक वाढल्या कारणाने भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत. यामुळे मेहनत करून देखील कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागत असल्याने शेतकरी पूर्णतः तुटल्याचे पाहायला मिळते आहे.
कळमेश्वर मार्केट मध्ये भाजीपाल्याची आवक इतकी वाढली आहे की, भाजीपाला विक्रीवाचून तसाच पडून राहत आहे. यामुळे शेतकरी आपला भाजीपाला जनावरांना चारा म्हणून खाऊ घालत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम