शेतकरी वर्गासमोर अजून एक संकट ; मुसळधार पावसाचा इशारा

1
28

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : बळीराजाला आता आणखी एका संकटाला सामोरे जावे लागू शकते. हवामान खात्याने महाराष्ट्रासह एकूण बारा राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोनाने आधीच संकटात टाकले असतांना, नंतरच्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. आत्ता कुठे बळीराजा सावरत असतांना आता पुन्हा येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

शेतकरी वर्ग सध्या वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीत, मशागतीत गुंतला आहे. आधीच्या अवकाळीने झटका दिल्यानंतर बळीराजा आत्ता कुठे सावरला होता. मात्र आता पुन्हा जोरदार पावसाच्या इशाऱ्याने चिंता वाढवली आहे.

विदर्भामध्ये ते गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या वातावरणात बदल होत जाऊन, थंडीचा पारा वाढला आहे. त्यात आता या पावसाच्या इशाऱ्याने वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. आता येत्या चोवीस तासांतच काय ते चित्र स्पष्ट होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here