द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागील काही वर्षांत ऋतुमानाचे चक्र पूर्णतः बदललेले दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्ग पूर्ण चिंतातुर झाला आहे.
बदलते ऋतुचक्र याला कारणीभूत माणूसच आहे. वातावरणात होणारे बदल हे ग्लोबल वोर्मिंगमुळे होत असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.
आधीच कोरोनामुळे शेतकरी वर्गासह सर्वच हैराण झाले आहेत. त्यात अवकाळी पावसाने देखील पूर्णतः झोडपले. त्यामुळे शेतकरी वर्ग पूर्ण मेटाकुटीला आला आहे.
आता राज्यात पुन्हा 23 आणि 24 जानेवारीला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आणि हा जोर पुढे कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम