द पॉईंट नाऊ ब्युरो : समीर वानखेडे आणि नवाब मलिक या दोघांनाही एकामागे एक झटके बसले.
समीर वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केल्यावर, वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली. यावर आयोगाने निर्णय देतांना, मलिक यांच्या विरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढणार आहेत.
दरम्यान, समीर वानखेडे यांच्या नावावर असलेले सद्गुरु हॉटेल आणि बारचा परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. हा परवाना रद्द करतांना दारूबंदी कलम 54 चा अवलंब करण्यात आला आहे.
समीर वानखेडे आणि नवाब मलिक या दोघांनाही हे झटके बसले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम