द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कृषी पंपांसाठीचे रात्रीचे अन्यायकारक भार नियमन रद्द करावे या मागणीचे निवेदन महावितरणच्या सहाय्यक अभियंता तथा गुणवत्ता नियंत्रक कल्याणी भोये देवळा तालुका भाजपच्या वतीने देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा की ,महावितरण कंपनीने नोव्हेंबर महिन्याचे कृषीपंपासाठी चे भारनियमन रात्री दहा ते सकाळी सहा अशा पद्धतीने केले आहे. सदरचे भारनियमन शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. एकीकडे वसुलीच्या नावाखाली ट्रांसफार्मर खंडित करायचे,तर दुसरीकडे शेतकऱ्यांवर अन्यायकारक भारनियमन लादायचे अशा प्रकारे शेतकऱ्यांचे सुलतानी पद्धतीचे शोषन सध्या राज्य सरकार व महावितरणच्या माध्यमातून सुरू आहे.सदरचे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असणारे भारनियमन त्वरीत रद्द करावे अशी मागणी भाजपने केली आहे.यावेळी तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, भाऊसाहेब आहेर, चंद्रकांत भामरे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष हर्षद मोरे,दिनेश मोरे उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम