मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ४ तारखेचा अल्टीमेटम दिला. अक्षय तृतीया आणि ईद एकाच दिवशी आल्याने पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त लावला आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेले राजकारण आणि त्यामुळे बिघडलेले वातावरण निर्माण झाले आहे. पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून 30 हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
गर्दीची ठिकाणं, मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये सोमवारी सायंकाळपासूनच बंदोबस्त वाढविण्यात आला. एसआरपीएफ तुकड्या, डॉगस्कॉड, बॉम्ब शोधक नाशक पथकांकडूनही ठिकठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. सर्व परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी शहरातील विशिष्ट भागात कडक बंदोबस्त केला आहे. विशेषतः वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची फौज वेगवेगळ्या भागात दक्षता बाळगणार आहे.
शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देऊन गुन्हेगारी तसेच उपद्रवी वृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले.कोणत्या ठिकाणी किती पोलीस बंदोबस्तासाठी ठेवायचे, त्याचे नियोजन करण्यात आले. पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ आणि होमगार्ड असा एकूण साडेतीन हजारांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम