दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत असल्याने शेतांवर देखील परिणाम दिसू लागला आहे. यामुळे गव्हाचे सर्वात मोठे उत्पादक नाराज होत आहेत. निर्यातीची शक्यता कमी होत असल्याने यामुळे जगभरात गव्हाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक स्तरावर गव्हाच्या पुरवठ्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. युक्रेन युद्धामुळे आधीच व्यापार विस्कळीत झाला आहे.
मार्च महिन्यात तापमान सर्वोच्च पातळीवर पोहोचले, गव्हाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्या एका महिन्यात उष्णतेमुळे गव्हाचे उत्पादन कमी झाले. एका सर्वेक्षणानुसार, या हंगामात उत्पादनात 10 ते 50 टक्क्यांनी घट झाली आहे. उत्पादनात घट झाल्याने मोठ्या प्रमाणावर अन्नटंचाईचा इशारा दिला जात आहे. आयातदार देश आता पुरवठ्यासाठी भारताकडे पाहत आहेत. भारतातून पहिली खेप इजिप्तला पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे. कमी उत्पादनामुळे ही कमतरता भरून काढण्याच्या भारताच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
कोरोनाकाळात आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांत गव्हाचा साठा कमी झाला. हे देश मुख्यतः रशिया आणि युक्रेनमधून गहू आयात करत होते. भारताने गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रमी आणि दुप्पट निर्यात असेल. आर्थिक वर्षात भारत 15 दशलक्ष टन गहू निर्यात करू शकेल, असा अंदाज अन्न आणि वाणिज्य मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेबाबतही चिंता निर्माण होत आहे. कारण कोट्यवधी लोक उपजीविकेसाठी आणि अन्नासाठी शेतीवर अवलंबून आहेत. कमकुवत उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटेल, खत आणि इंधनाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम