द पॉईंट नाऊ ब्युरो : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आता वेगळाच आरोप केला आहे. मोदींच्या दबावामुळे माझे ट्विटरवरील फॉलोवर्स कमी झाले आहेत, असा आरोप राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरला तसं पत्रच लिहिलं आहे म्हणे. मोदी सरकारच्या दबावामुळेच ट्विटरवरील आपली फॉलोवर्सची संख्या घटत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी हे तसे तरुणाईमध्ये लोकप्रिय नेते. मात्र मागील काही काळापासून त्यांची ट्विटरवरील फॉलोवर्सची संख्या मात्र घटत चालली आहे. अर्थात, आधी जिथे राहुल गांधींचे फॉलोवर्स दरमहा 2-3 लाखाने वाढायचे, तो आकडा आता मात्र थेट अडीच हजारांवर आली आहे.
आता राहुल गांधींच्या पाठवलेल्या पत्राला ट्विटर काय उत्तर देते? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम