द पॉईंट नाऊ ब्युरो : नागपूरमध्ये एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका आठवीच्या मुलीने ‘मृत्यू किती सुंदर आहे’ असे म्हणत आपली जीवनयात्रा संपवली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आर्या मानकर या आठवीच्या विद्यार्थिनीला डायरी लिहायची सवय होती. तिने मृत्यू किती सुंदर आहे, या विषयावर आपले विचार लिहून काढले. ‘जर कोरोना परत आला, तर मला मरायला आवडेल’ असे लिहून ठेवत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे.
आर्याचे वडील हरिश्चंद्र मानकर हे व्हिएनआयटी महाविद्यालयात नोकरी करतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा M. Sc आणि मुलगी 12 वीत आहे. लहान आर्या ही अतिशय हुशार मुलगी होती. ती माउंट कारमेल शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होती. तिला डायरी लिहायचा छंद होता. मात्र मागील काही दिवसांपासून ती अबोल झाली होती. मृत्यूसंदर्भात ती आपल्या डायरीत वेगवेगळे लिखाण करत होती. तिची आई तिला बोलवायला गेली असता, त्यांना आर्याने आपले जीवन संपवलेले दिसले. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.
आर्याच्या आत्महत्या करण्याने मानकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Kharach mrutu khup sundar ahe😊