द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आज पुणे येथे बोलत असतांना नाना म्हणाले की मुस्लिम मुलांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, नाम फाउंडेशनच्या वतीने आज खडकवासला बहुली येथे आगीत जळालेली 16 घरे बांधून देण्यात आलीत ही घरे नाना पाटेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आलीय त्यावेळी नाना बोलत होते.
सरकार करेल तेव्हा होईल असं नाही, लोकांनी पुढे आला पाहिजे, सगळ्या गोष्टी सरकारच्या भरवश्यावर शक्य नाही, जे जमेल ते प्रत्येकाने करावं इच्छाशक्ती असली पाहिजे, अस सांगत काश्मीर मध्ये ही वॉटर बँक देऊन मुस्लिम मुलांना मुख्य प्रवाहात आणायचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. ते ही आपलेच असून दोन तीन पिढ्या पूर्वी धर्म बदललाय म्हणून ते आज मुस्लिम आहेत, जात,धर्म बघण्या ऐवजी सगळ्यांमधला माणूस शोधायला हवा. असे मत पाटेकर यांनी व्यक्त केले.
सर्व राजकिय पक्षांनी आज मदत केली इतरवेळी का करत नाही असा चिमटा देखील नानांनी राजकारण्यांना काढला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम