मुंबई प्रतिनिधी : शिवसेना भवन ही वास्तू ऐतिहासिक आहे, अनेक हल्ले या वास्तुने पचवले आहेत. शरद पवारांचा देखील फोन आला, सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन व शुभेच्छा . केंद्रीय यंत्रणेच्या विरोधात आज आपण रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही, मराठी माणूस बेईमान नाही, नामर्दांगी करून वार केले तरी सेना घाबरणार नाही. सेनेच्या नेत्यांना जाणून बुजून टार्गेट केलं जातंय. केंद्रीय तपास यंत्रणा हे देशावरील संकट आहे. महाराष्ट्रातील सरकार यांना पाडायचे आहे. दबाव टाकून गुडघे टेकायला भाग पाडतायत मात्र आम्ही झुकणारे नाहीत.
नायडुनां पत्र लिहले तेव्हापासून हे सर्व सुरू झाले. भाजपाच्या तीन नेत्यांनी सांगितले तुम्ही सरकार पासून बाजू व्हा आम्हाला सरकार पडायचं आहे, तुम्ही जर आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय यंत्रणा तुम्हाला टाईट करतील असे सांगितले, भाजपा नेते म्हणाले पवारांना देखील आम्ही टाईट करतोय. मुलुंडचा दलाल सांगतो संजय राउतला अटक होईल हे अतिशय धक्कादायक आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम