सलीम शेख
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (मालेगाव) : कप्रतिनिधींना नागरिक मोठ्या आशेने कामे व्हावीत या दृष्टीने निवडून देतात. मात्र मालेगाव मध्ये प्रभाग 7 च्या नगरसेवकांना आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला दिसून येत आहे.
मालेगाव शहरातील प्रभाग 7, अर्थात निहाल नगरची पूर्णतः दुर्दशा झालेली दिसून येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता हा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. मात्र निहाल नगर मध्ये पूर्णतः घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अक्षरशः घाणीमधून लोकांना वाट काढून मार्गक्रमण करावे लागत आहे.
काँग्रेसचे नगरसेवक सलीम अन्वर, फकिरा हाजी यांचे या पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याकडे काहीही लक्ष नाही. नागरिकांनी वारंवार तक्रार करुन देखील लोकप्रतिनिधी मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. लोकप्रतिनिधी हे निवडणुकीच्या आधी मोठ्या आणाभाका घेऊन नागरिकांना त्यांच्या सेवेची गाजरं दाखवतात. मात्र ही गाजरं देखील नागरिकांच्या नशिबी पडत नाहीत, असच चित्र निहाल नगर मध्ये दिसून येत आहे.
या परिसरात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याने नागरिकांच्या नाकीनऊ आले आहे. आधीच वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त असतात. त्यावर अशी ही स्वच्छतेची परिस्थिती असेल, तर नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊन त्यांना रोगराईच्या घशात ढकलण्यासारखेच आहे. जर कामेच करायची नसतील तर लोकप्रतिनिधी काय फक्त आश्वासन द्यायलाच पुढे येतात का, असा सवाल करत अशीच परिस्थिती राहिल्यास पुढील निवडणुकीत चित्र वेगळे दिसेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम