द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : गोंदिया जवळील मध्य प्रदेशतील बालघाट तालुक्यात किरणापूर शहरामध्ये एका महिलेने बालाघाट जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये चार मुलांना जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. ही शस्त्रक्रिया २३ मे ला रात्री ११:३० वाजता पार पाडली. बालाघाटच्या रुग्णालयामधील झालेल्या या शस्त्रक्रियेत नवजात चारही बाळं निरोगी स्वस्थ असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली.
नवजात चार बाळांपैकी तीन मुले आणि एका मुलगी आहे. चारही बाळं निरोगी आहेत. बालघाट जिल्ह्यातील ही पहिली घटना स्पष्ट केले जात आहे. सिव्हिल सर्जन कम रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय धाबरगावे यांनी सांगितले आहे की, सोमवार २३ मे ला किरणापूर तालुक्यातील जरही मधील प्रीती नंदलाल मेश्राम यांच्या प्रसुतीच्या वेळेस प्रीती यांनी चार बाळांना जन्म दिला आहे.
ट्रॉमा युनिट तज्ज्ञ पथकातील डॉ. रश्मी वाघमारे आणि भूलतज्ज्ञ डॉ. दिनेश मेश्राम, परिचारिका सरिता मेश्राम आणि त्यांच्या तज्ज्ञ पथकाने रात्री ११:३० वाजता २६ वर्षीय प्रीती यांची शस्त्रक्रिया केली. प्रीती यांनी चार गोंडस बाळांना जन्म दिला आहे. चारही बाळांना जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे.
सध्या चारही बालके सदृढ असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या बाळांना आता तरी कोणतीही वैद्यकीय समस्या असल्याचे जाणवले नाही. या कठीण शस्त्रक्रियेसाठी मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ.मनोज पांडे यांनी जिल्हा रुग्णालयामधील डॉक्टरांचे व टीमचे अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम