द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : आधी आरोग्य विभाग आणि आता म्हाडा. आज म्हाडाच्या परीक्षेचा पेपरही फुटला.
महाविकास आघाडी सरकारचा सावळा गोंधळ काही केल्या थांबतांना दिसत नाही आहे. आधीच परीक्षांचा कालावधी लांबवला गेला होता. त्यानंतर होणाऱ्या परिक्षांमध्येही गोंधळच गोंधळ बघायला मिळाला.
म्हाडा द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील आज पेपर फुटीचा प्रकार घडला. म्हाडाचा पेपर फुटल्याने आज म्हाडाची परीक्षा देखील रद्द करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकार द्वारे नियोजनात कसलीही सुसूत्रता दिसून येत नाही आहे. आणि त्याचे परिणाम मात्र परीक्षार्थी विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत.
म्हाडा द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे पेपर परीक्षा नियोजन करणाऱ्या व्यक्तीच्या लॅपटॉप मध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशा प्रकारे परीक्षा रद्द होत राहिल्या तर विद्यार्थ्यांचे भवितव्य असेच अंधारात जायचे. अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान म्हाडाची परीक्षा रद्द झाल्याने परिक्षेसाठीचे घेण्यात आलेले शुल्क परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परत दिले जाईल. असे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. मात्र असे शुल्क परत देऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत CBI चौकशीची मागणी केली आहे. फडणवीस यांनी यासाठी महाविकास आघाडी सरकार वर टीका केली आहे.
अशा प्रकारे पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत असल्याने, महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
याआधी आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये देखील असाच भोंगळ कारभार दिसून आला होता. परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या. मात्र परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या परीक्षा सेंटर मध्ये मोठा गोंधळ दिसून आला. त्यानंतर परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या. आणि त्यातही पुन्हा तोच गोंधळ दिसून आला. यामुळे विद्यार्थी वर्गाला मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.
आता म्हाडाच्या परीक्षेमध्ये देखील थेट पेपर फुटीचा प्रकार घडला. आणि पुन्हा बळी पडला तो विद्यार्थीच. मात्र अशा प्रकारे परीक्षांचे नियोजन खाजगी अखत्यारीत का दिले जाते? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे विद्यार्थी वर्गाचे भवितव्य अधांतरी लटकावले जात आहे. या कारणास्तव परीक्षार्थी विद्यार्थी वर्गामध्ये प्रचंड संतापाची लाट आहे.
यामागे नेमके कारण काय? यात सावळा गोंधळ नेमका कसला आणि का? की यात अजून काही गौडबंगाल आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम