महाराष्ट्रात पुन्हा एकदा पंचसूत्रांचे करावे लागणार पालन 

0
25

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असले तरी , राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या बघता पुन्हा एकदा मास्कसक्ती होऊ शकते. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.

दिल्लीत कोरोना रूग्णांची आकडेवारी दोन हजारांच्या आसपास पोहोचली आहे. त्यात मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि सोबतच मास्कची देखील सक्ती केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र पाठवून महत्वाची माहिती दिली. मुंबईत देखील कोण कोरोना रुग्ण संख्या वाढत असून सर्वांनी या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्कचा वापर करा, सेनीटायझर वापरा अशा अनेक पंच सूत्रांचे वापर करून करून यावर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवून शकतो.

महाराष्ट्रात 1 एप्रिल रोजी मास्कसक्ती हटवण्यात आली होती. मात्र, मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मास्कसक्ती परतण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत दिलासादायक बाब समोर आली, कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाल्याची नोंद दिल्लीत मंगळवारी करण्यात आलेली नाही. दिल्लीत 28 टक्क्यांनी रुग्ण वाढत आहे. काही दिवसांत दिल्लीत कोरोना रुग्णवाढ तिप्पटीने असल्याची संख्या समोर आली आहे. कोरोनाचे दिवसाला हजारांपेक्षा जास्त रुग्ण, साप्ताहिक कोरोना पॅझिटीव रूग्ण एक टक्क्यापेक्षा कमी आहेत.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here