चांदवड : “महात्मा फुले यांनी यांनी भारतीय समाजाचे अध्यापक पडतं हे शिक्षण अभावी होत असल्याची ओळखून श्री आणि उपेक्षित वर्गासाठी शिक्षणाची प्रवेशद्वार खुले केले आणि इथूनच महाराष्ट्राच्या प्रबोधनाला आणि विकासाला सुरुवात झाली.यामुळे महात्मा फुले क्रांती दर्शी विचारवंत म्हणून काळाच्या इतिहासात अजरामर ठरले आहे”असे प्रतिपादन पिंपळनेर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख आणि अभ्यास डॉ. सतीश म्हस्के यांनी केले.
येथील आबड- लोढा- जैन महाविद्यालयात महात्मा फुले अध्यासन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ दत्ता शिंपी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचीन समन्वयक आणि उपप्राचार्य तुषार चांदवडकर यांनी केले.
“महात्मा फुले यांचे कार्य आणि विचार विद्यार्थ्यांमध्ये आज रुजविणे अत्यंत महत्त्वाचे आहे या हेतू तुन अध्यासन केंद्र महाविद्यालयात सुरू करण्यात आल्याचे डॉ चांदवडकर म्हणाले.महात्मा फुले यांनी केवळ विचारच मांडला नाही तर प्रत्यक्ष प्रबोधनाचे कार्य केले. स्त्रियांच्या प्रश्नांचा मूलभूत विचार आणि हक्क त्यांनी मांडला. हे त्यांचे कार्य व्यापक हेतूतून झाले. मात्र आज दुदैवाने शिक्षण क्षेत्राची वाताहात झाली आहे. ही गंभीर बाव असून या बाबत कोणही ओरड वा उठाव करीत नाही”.
अध्यक्षीय मनोगत डॉ दत्ता शिंपी यांनी केले. सूत्रसंचालन महात्मा फुले अध्यासन केंद्राचे सहसमन्वयक डॉ. प्रशांत पालकर यांनी तर आभारप्रदर्शन द्वितीय वर्ष विज्ञान शाखेचा विदयार्थी संदीप नागर यांनी केले, डॉ आर. जे. इंगोले,श्रीमती व्ही.आर. जाधव, डॉ सी के कुदनर, डॉ पी.आर.सोहनी , प्रा.नितीन जैन, प्रा.संदीप पगार, प्रा.संतोष ठाकरे,प्रा. मुकेश देशमाने, प्रा.श्रीकांत ढापसे, प्रा.किशोर अहिरे, उपस्थित होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम