मुंबई प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मशिदींवरील भोंगे उतरवायला येणाऱ्यांना आमचे कार्यकर्ते विरोध करतील असे वक्तव्य केले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की आम्ही मशिदींवरील भोंगे काढण्याच्या भूमिकेला विरोध करतो.आमच्या पक्षाची लोक मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करतील. भोंगे काढण्यास येणाऱ्यांना आमचे पक्ष विरोध करेल.
मुस्लिम समाजाला शांतता पाळण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले. आपल्या कोणत्याही वक्तव्यावरून देशावर काही संकट ओढवू नये म्हणून चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या मुस्लिम मौलानांनी शांत राहावे.उलटेसुलटे बोलून हा वाद वाढवू नका असा सल्ला देखील आठवले यांनी दिला .
गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या विरोधी भूमिका बजावली होती. ठाण्यातील सभेत त्यांनी त्याचे पुनरुच्चार केला. 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मुदत राज ठाकरे यांनी दिली आहे. मुदतीस काहीच दिवस बाकी आहेत.तत्पूर्वी औरंगाबाद येथे होणाऱ्या 1 मे च्या सभेत राज ठाकरे काय बोलणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम