द पॉईंट नाऊ ब्युरो : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर आता खासदार छत्रपती संभाजी राजे मुंबईतील आझाद मैदानावर 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणास बसणार आहेत. याबाबत त्यांनी नुकतीच घोषणा केली.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही निकाली निघालेला नाही. दरम्यानच्या काळात मराठा समाजाद्वारे आंदोलनही करण्यात आले. तर खासदार संभाजी राजे यांनी महाराष्ट्र शासनाला इशारा दिला होता. मात्र अद्यापही याबाबत महाराष्ट्र शासन उदासीन असल्याने आता संभाजी राजे उपोषणास बसणार आहेत.
मराठा समाज खासदार संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची लढाई लढत आहे. कोविडच्या कारणाने मराठा समाजाद्वारे निघणारे मोर्चे थांबवण्यात आले होते. मात्र आता संभाजी राजे यांनीच आमरण उपोषणास बसणार असल्याचे सांगितल्याने वातावरण अधिक पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता याबाबत महाराष्ट्र शासन काय पाऊल उचलते? याकडे लक्ष लागले आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम